डिजिटल भीम जयंती!" प्रा.डॉ.प्रदीप शिंदे, सातारा

"डिजिटल भीम जयंती!"
                         प्रा.डॉ.प्रदीप शिंदे, सातारा 

14 एप्रिल या दिवसाचे महत्व भारतीयांच्या दृष्टीने फार मोठे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या  जयंतीचा दिवस.संपूर्ण जगात या महामानवाला मानवदंना दिली जाते.सुर्योदयापासून संविधान प्रेमी, देशप्रेमी लोक आपल्या जीवनातील अज्ञानरूपी काळाकुट्ट अंधार नष्ट करणा-या ज्ञानसूर्यास विनम्र अभिवादन करण्यासाठी  लाखोंच्या संख्येने एकत्र येतात.परंतु या 14 एप्रिल ची परिस्थिती भीमसैनिकांसाठी वेगळी आहे. कोरोना चे संकट संपूर्ण जगावर आहे.याचे भान संपूर्ण भारतीयांना आहे. एकीकडे कोरोना मुळे गरीब पिडीत हतबल झाले आहेत आणि दुसरीकडे तमाम भारतीयांच्या जीवनाला आकार देणारे आधुनिक भारताचे जनक,संविधान निर्माता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.एका डोळ्यात कारूण्य दुस-या डोळ्यात डॉ.बाबासाहेब यांच्या बद्दल असणारी कृतज्ञता! म्हणूनच  ही  जयंती अखिल विश्वाच्या दृष्टीने अनोखी आहे. ही जयंती डिजिटल भीम जयंती चे स्वरूप धारण करीत आहे. या वेळेस हे अभिवादन कोरोनाच्या प्रादूर्भावाने अभियानाचे रूप धारण करीत आहे. रैली, प्रतिमेची मिरवणूक, रोषणाई, फटाक्यांची आतिशबाजी असं काहीही नसणार आहे.

अभिवादन ते अभियानामध्ये प्रथम परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घरामध्ये अभिवादन केले जाईल. भारत देशाचा प्राण म्हणजेच संविधान म्हणून घरोघरी संविधानाच्या प्रास्ताविकतेचे वाचन होईल.या कार्यक्रमाचे  फोटो आणि विडियो सोशल मिडियावर शेअर होतील. जयंतीनिमित्त भारतीय संविधानाचा सन्मान राखून, कायद्याचे पालन करून, घरीच राहून जगापुढे एक आदर्श निर्माण केला जाईल. भारतीय संविधानाची ताकद प्रचंड आहे हे कोरोना च्या निमित्ताने दिसून येत आहे. तब्बल 130 करोड जनता एकाच वेळी कायद्यातील कलम आणि लॉकडाऊन मुळे घरीच बसून शांततेत नियमांचे  पालन करीत आहे. धार्मिक सण,समारोह ,उत्सव काहीही नाही. एवढेच काय मंदिर मस्जिद चर्च सुध्दा लॉकडाऊनचे पालन करीत आहेत.

          भारतीय घटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विविध ग्रंथाचे वाचन होत आहे. मोबाईलच्या सोशल साइट च्या माध्यमातून चर्चा होऊन विचारांची देवाण-घेवाण होत आहे.सातारा येथील लुंबिणी संघाने ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन केले आहे, या स्पर्धेच्या निमित्ताने संविधाना बरोबरच डॉ. बाबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक,राजनैतीक आर्थिक ,सांस्कृतिक कार्याची ओळख होणार आहे. ऑनलाईन भीमगीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख व लोकांचे प्रबोधन होणार आहे. डिजिटल भीमजयंती चा उद्देश हा आहे की जयंती निमित्त्याने जो पैसा खर्च केला जात होता तो पैसा या वेळेस कोरोना मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गोर गरिबांच्या मदतीसाठी वापरला  जाणार आहे.समता सैनिक दल,बहुजन संघटना,आंबेडकर वादी पक्ष अशा अनेक संघटना कोरोना शी युध्द करीत आहेत. आडल्या नडलेल्यांना अहोरात्र मदत करीत आहेत.आंबेडकरवाद म्हणजेच मानवतावाद आहे! याच दिशेनेच वाटचाल करून भीमजयंती साजरी केली जात आहे.
आत्ताची पिढी डिजिटल जनरेशन म्हणून ओळखली जाते.आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे.डिजिटल आंबेडकर जयंती च्या  निमित्ताने  लहान मुलांपासून ते थोरामोठ्या पर्यंत सर्वांना घरबसल्या अनेक उपक्रमांमध्ये भाग घेता येणार आहे. या मध्ये इलेक्ट्रॉनिक मिडियाचा वापर जास्तीत जास्त दिसून येणार आहे. जगातील एकमेव डिजिटल भीमजयंती ही सर्वार्थाने नवा आदर्श घेऊन पुढे येत आहे.यामधून जगातील भीम अनुयायी एकवटला जाऊन एकमेकांशी यु ट्यूब, फेसबुक, वाटसॲप, इंटरनेट अशा माध्यमातून संपर्क साधणार आहे. सोलापूर येथील प्रा.डॉ.संघप्रकाश दुड्डे सरांनी राष्ट्रीय ऑनलाईन कवि सम्मेलन आयोजित केलेले आहे.तसेच  विद्यार्थ्यां करिता सोशल साइट वर ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन केले आहे. व यशस्वी स्पर्धकांना बक्षिस ही दिले जाणार आहेत. फेसबुकच्या माध्यमातून व्याख्यानमाला ही आयोजित केलेली आहे. या दोन्ही कार्यक्रमात नामवंत कवी आणि विचारवंत आपले योगदान देणार आहेत. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे जनक आहेत.त्यांनी सातत्याने आधुनिकतेचे समर्थन केले आहे. त्यांचे बाह्य व्यक्तीमत्व सुध्दा अत्यंत प्रभावी, करारी होते. राहणीमान उच्च दर्जाचे होते,सूट बुटा मध्ये त्यांचे व्यक्तीमत्व प्रभावी आणि दिमाखदार दिसायचे. बाबासाहेब कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना वाचनाची आणि लिखानाची आवड होती. त्याचबरोबर व्हायोलिन वाजवायला आवडत असे.अशा प्रकारे उच्च दर्जाची अभिरुची असणारे  बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व 'उच्च राहणीमान आणि उच्च विचार' असे होते. पुरोगामित्वाचा आणि आधुनिकतेचा अंगिकार करणारे डॉ.बाबासाहेब यांची जयंती ही लॉकडाऊन च्या काळात अभिवादन एक अभियान बनत आहे .या निमित्ताने अनेक प्रकारे सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम होत आहेत.लॉकडाऊनच्या काळात आपल्या आसपास कोणी गरीब अडचणीत असेल तर त्यांना मदत करणे. कोणीही उपाशी राहणार याची काळजी घेणे .चांगल्या वैचारीक ग्रथांचे वाचन करने  त्यामध्ये  'बुद्ध आणि त्यांचा धम्म', संविधान' आणि अन्य चरित्र ग्रंथाचा समावेश असणार आहे.दारू,तम्बाखू अशा व्यसनापासून कायमचे दूर राहणे,तशी शपथ घेणे महत्वाचे ठरणार आहे.अंधश्रद्धा, अदृश्य शक्ति,चमत्कार या गोष्टींवर विश्वास न ठेवणे ,भोंदू बाबा ,चमत्कारी लोकांपासून दूर राहणे. विवेकवान और विज्ञानवादी बनने.उच्च अभिरुचींना जीवनात स्थान  देण्याच्या दृष्टीने चांगल्या विचारवंताची पुस्तके वाचणे, चांगले  गीत ,संगीत ऐकणे ,मैदानी खेळ खेळणे महत्वाचे आहे.  आरोग्यपूर्ण  जीवनासाठी रोज प्रत्येकाने व्यायाम करणे आवश्यक आहे. रोज चौरस आहार घेणे जरूरी आहे.आपली संपत्ती धन पैसा याचा विनियोग योग्य पध्दतीने केला पाहिजे. मुलांच्या  शिक्षण आणि सामाजिक हित लक्षात घेऊन इतरांना ही मदत करून लोक सामाजिक
 दायित्व पार पाडीत आहेत. डिजिटल भीमजयंती साजरी होत असताना अनेक अभिनव प्रयोग करून छोटे मोठे ऑनलाइन उपक्रमांचे  नियोजन आयोजन करून  ते र

Comments

Popular posts from this blog

10 New criteria of NAAC and its specialties - Dr. Sangprakash Dudde, Sangameshwar College Solapur

जन संचार की परिभाषा ,स्वरूप,-डॉ संघप्रकाश दुड्डेहिंदी विभाग प्रमुख,संगमेश्वर कॉलेज सोलापुर (मायनर हिंदी)

काल के आधार पर वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए?