चालत रहा मागे वळून बघू नका

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगतीला सुरुवात होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच.सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा.हा निसर्गाचाच नियम आहे.पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते.मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भणभणू लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. *खूरट्या विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि तुम्हाला कमी लेखण्याची संधी शोधू लागतात.* मग तुमच्यावर आरोप होतात- गैर व्यवस्थापनाचे,गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे,बेजबाबदारीचे असे लोक आपल्याला अप्रत्यक्ष विरोध करत असतात, तुमच्यातील चांगूलपणा झाकून,तुम्ही किती वाईट आहात हे दाखविण्यासाठी तुमच्यातल्या ऊणीवा ओरडून सांगत छुप्या चर्चा सुरु होतात. *सत्यनिष्ठ,प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाहीत पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात.* त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. खरे नुकसान हे या क्षणाला होते. *अशावेळी शांत राहणे ही समंजस पणाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे,आवाज चढवणे म्हणजे एका अर्...